भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार educational thoughts of bharatratna do babasaheb ambedkar 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार educational thoughts of bharatratna do babasaheb ambedkar 

➡️आपल्या सर्व सामाजिक दुखण्यावर शिक्षण हेच एक औषध आहे.

➡️समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे.

➡️पुस्तकाशिवाय शिक्षण अपुरे आहे.

➡️शिक्षणाने माणसाला माणूसपण मिळते, त्याच्या अस्तित्वाची ओळख पटते

➡️शिक्षणाच्या अभावी माणूस निर्बुध्द राहिल्यास तो जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो.

➡️व्यक्तिस्वातंत्र्याची आवश्यकता जर मान्य असेल तर दरेक व्यक्ती च्या ठायी आपले स्वातंत्र्य रक्षण करण्याची शक्ती उत्पन्न होणे अत्यंत जरुरी आहे व ती शिक्षणाशिवाय उत्पन्न होवू शकत नाही.

➡️प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगिण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे.

➡️संशोधनवृत्ती ही प्राध्यापकाच्या जीवनातील अपरिहार्य व आवश्यक बाब आहे.

➡️शिक्षण म्हणजे व्यक्तिचा मानसिक व बौध्दिक विकास घडवून आणणारे, सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचे, आर्थिक विकास साधण्याचे व राजकिय स्वातंत्र्य मिळविण्याचे शस्त्र आहे.

➡️ज्ञान म्हणजे व्यक्तिच्या जीवनाचा पाया आहे, आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांने बुध्दीचा विकास करण्यासाठी हालअपेष्टा सहन करुन ज्ञान मिळविले पाहिजे आणि त्या ज्ञानाच्या बळावर स्वतंत्रपणे विचार करावयास शिकले पाहिजे.

➡️आपण जास्तीत जास्त ज्ञान कमावले पाहिजे, पण नुसतेच पुस्तकी राहता कामा नये, लेखणी अणिवाणी कमावली पाहिजे, हाती झोळी घ्यावी, पण ज्ञान प्राप्त करावे त्याशिवाय आपल्या प्रगतीच खरं मापन होणार नाही.

➡️विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणूसकी नाही.

➡️विद्या महासागरासारखी आहे माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे, तशीच

➡️विद्येचीही आवश्यकता आहे.

➡️शिक्षण हे एक पवित्र संस्था आहे, शाळेत मने सुसंस्कृत होतोत, शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र.

➡️शिक्षण हे राष्ट्रीयतेचे, मानवतेचे नि अज्ञानतिमिर दूर करण्याचे उदात्त कार्य आहे.

➡️शिक्षक वर्ग हा राष्ट्राचा सारथी आहे. कारण त्याच्या हाती शिक्षणाच्या नाड्या असतात.

➡️सुशिक्षीत पण विनयहिन आणि चारित्र्यहीन माणूस हा पशुपेक्षा भयंकर असतो.

➡️शिक्षणापेक्षा चरित्र महत्वाचे.

➡️सुशिक्षीत मनुष्याचे शिक्षण गरीब जनतेच्या हितास विरोधी असेल तर तो समाजाला शाप ठरतो.

➡️केवळ स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्यापेक्षाही आपला शैक्षणिक आणि सांस्कृतिक उध्दार आधी करुन घ्यावा.

➡️विद्यार्थ्यांनी दोन गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत एक म्हणजे, बुध्दिमतेत आणि कार्यक्षमतेत आपण कमी पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, आणि दोन, व्यक्तिगत सुखापेक्षा आपला समाज स्वतंत्र स्वावलंबी व सन्माननीय कसा हाईल याकडे लक्ष पुरविले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Leave a Comment