स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार educational thought of swami vivekanand
➡️शिकणे हाच माझा धर्म आहे.
➡️शिक्षण लाभल्याने सामान्य जनता जीवन संग्रामाला लायक व्हावयास हवी.
➡️शिक्षणाने चारित्र्य बल, वरसेवातत्परता व सिंहासारखे साहस निर्माण व्हावयास हवे.
➡️सुरुवातीला मनोनिग्रहाचे शिक्षण दिले पाहिजे.
➡️लोकांना त्यांच्या भाषेतून शिक्षण द्या.
➡️थोडेफार तांत्रिक शिक्षण मिळणे बरे, त्यामुळे निदान लोकांना उदानिर्वाहाचे साधन तरी मिळेल.
➡️नोकरीसाठी उगीच ओरडत फिरायचे आणि व्यर्थ वेळ घालवायचा ते तरी टळेल.
➡️तुम्ही फक्त पाचच विचार जर अगदी आत्मसात केले असतील, तर ते जर आपल्या जीवनात चारित्र्यात उतरवले असतील, तरी खास ग्रंथसंग्रह पढून, कोळून पिऊन टाकणाऱ्या माणसापेक्षा खासच तुम्ही अधिक सुशिक्षित आहात.
➡️शिक्षण म्हणजे जन्मात कधी पचनी न पडणारे, डोक्यात निरंतर धुडगूस घालणारे आणि आपल्या मेंदूत ठासून कोंबलेले माहितीचे भेंडाळे नव्हे.
➡️यथार्थ सहानुभूतीखेरीज खरे शिक्षण केंव्हाही शक्य नाही.
➡️मनुष्य निर्माण करणारे सर्वागिण शिक्षण आपल्याला हवे आहे.
➡️आपल्याला इतरांपासून शिकले हे पाहिजे तुम्ही जमिनीत बी पेरता, त्याला हवा, पाणी, खत आदी
➡️देऊन त्याची जोपासना करता, पण जेंव्हा त्याचे पुढे रोप व नंतर विशाल वृक्ष होतो तेंव्हा तो काय हवा बनतो की माती बनतो? नाही तो हवा, पाणी, माती यामधुन सार मात्र आत्मसात करुन
➡️स्वतःच्या प्रगतीनुसार एक विशाल वृक्ष बनतो. तुमचेही धोरण असेच असले पाहिजे.
➡️अकरणात्मक शिक्षण वा निषेधप्रधान शिक्षण हे मृत्युहून वाईट होय.
➡️ज्या प्रकारचे शिक्षण सध्या प्रचलित आहे तसले नव्हे तर यथार्थ शिक्षण द्यावयास हवे. फक्त पुस्तकी शिक्षण काही कामाचे नाही.
➡️समस्या आहेत, अनेक गंभीर समस्या आहेत. पण शिक्षण ह्या एका जादुच्या शब्दाने जी सोडवली जाणार नाही, अशी एक समस्या नाही.
➡️सेवा धर्माचे एकनिष्ठ आचरण करा. प्रथम स्वयंसेवक व्हा,
➡️देश-सेवक व्हा, पण तुम्ही स्वामी आपोआप व्हाल.
स्वामी विवेकानंद