सुंदर शालेय मराठी सुविचार संग्रह good thought
कोकीळा सुंदर गाते, म्हणून चिमणीचा चिव-चिव करण्याचा हक्क हिरावून घेता येत नाही.
द्वेषाने द्वेशाला उत्तर दिले तर द्वेश कधीच संपणार नाही. म. गांधी
ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उत्तम आहे.
पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते, व अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते.
स्त्रीशिक्षण म्हणजे भावी पिढ्यांच्या ज्ञानाची पाणपोई होय.
नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे.
श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा.
व्यक्तिमत्व विकासाचे व सामाजिक क्रांतीचे प्रभावी साधन म्हणजेच शिक्षण.
बालमनाची कळी प्रेगाच्या फुंकरेने फुलवीत असतात, तेच गुरु.
सशस्त्र माणसापेक्षा अधिष्टान असलेलाच माणूस अजिंक्य असतो.
ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकिय क्रांतीचा पाया आहे.
प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते.
अज्ञानी असणे गुन्हा नाही, तर ज्ञान न मिळविण्यासाठी धडपड न करणे हा गुन्हा आहे.
अतिशयोक्ती ही असत्याची जननी आहे.
संकटकाळी जो उपयोगी पडतो, तोच खरा मित्र.
मुलांचे मोठेपण आईच्या हाती असते.
नम्रमा हा माणसाचा खरा दागिना होय.
सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.
भिकेच्या पोळीपेक्षा कष्टाची भाकरी केंव्हाही चांगल.
ज्ञानाचा प्रसार म्हणजे समानतेचा विस्तार साने गुरुजी.
शाळा हे समाजाने, समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेल एक संस्कार केंद्र आहे.
सत्य, समता, स्वातंत्र यांचा मिलापा आणि आचार, विचार, उच्चार,
यांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण क.भा. पाटील
चारित्र्याचा विकास घडविते, तेच खरे शिक्षण.
सन्मानाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण ऑरिस्टॉटल,
दुसऱ्याच्या दुःखांचा जो विचार करावयास शिकला, तोच खरा सुशिक्षीत.
वाचन माणसास पुर्णत्वाकडे नेते, संभाषणाने माणूस तत्पर बनतो.
जीवन फुलासारखे असू द्या, पण ध्येय मात्र मधमाशासारखे ठेवा.
कुसंस्कारास सुवळण व सुसंस्काराची उन्नती हेच खरे शिक्षण होय.
शिक्षण म्हणजे समजा सुधारणा. पेस्टॉलॉझी.
शिक्षण म्हणजे आत्म्याच्या विकासाचे साधन होय.
शिष्य कितीही विद्वान असला, तरी गुरुजनांच्या हाताखाली वागताना त्याची विद्वता मावळतेच.
– विनोबा भावे.
प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत देणारे हात पवित्र असतात.