प्रार्थनेविषयी महात्मा गांधी यांचे विचार mahatma Gandhi’s thought about prayer
➡️प्रार्थनेमध्ये अमर्याद शक्ती असते.
➡️प्रार्थना आत्मशुध्दीचे व आत्मपरिक्षणाचे आव्हान असते.
➡️प्रार्थना आणि सदिच्छापूर्वक केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाही.
➡️प्रार्थनेशिवाय अंतर्गत शांती मिळू शकत नाही.
➡️प्रार्थनेचा अर्थ सदाचरण असावयास हवा.
➡️प्रार्थना किंवा भजन जिभेने नव्हे, हृदयाने होत असते.
➡️दिवसाचे काम प्रार्थनेने सुरु करावे.
➡️अर्थहीन स्तोत्रपठण म्हणजे प्रार्थना नव्हे.
➡️प्रार्थना जेंव्हा आपोआप हृदयातून ओसंडते तेंव्हाच ती खरी प्रार्थना असते.
➡️प्रार्थना मनुष्याचा सर्वात मोठा आधार आहे.
➡️प्रार्थना म्हणजे अंधविश्वास नव्हे.
➡️प्रार्थना आपण अधिक शुध्द होण्याची आतुरता सुचित करते.
➡️प्रार्थनेशिवाय कोणताही प्रयत्न सफल होत नाही.
➡️प्रार्थना ही मानवी जीवनाचे मार्मिक अंग आहे.
➡️प्रार्थना ही सर्व धर्माच्या अनुयायांसाठी असते.
➡️भक्तिपूर्ण हृदय हेच प्रार्थनेचे खरे वाहन आहे.
➡️ईश्वराकडे याचना करणे म्हणजे प्रार्थना नव्हे.
➡️प्रार्थना म्हणजे आत्म्याने ईश्वराला घातलेली साद होय.
➡️प्रार्थना सर्व धर्माचा प्राण आणि सार आहे.
➡️आत्मशुध्दीचे सोपे आणि सरळ असे साधन म्हणजे प्रार्थना.
➡️मला जी काही सफलता आणि मनःशांती मिळाली आहे ती केवळ प्रार्थनेमळेच.
➡️प्रार्थनेमध्ये तल्लीन होवून जाणे हीच खरी उपासना आहे.
➡️प्रार्थना हे ईश्वराबरोबर केलेले सहकार्य होय.
➡️प्रार्थनेद्वारा होणाऱ्या ईश्वरांच्या कृपेमुळे आपण आपल्या कमकुवतपणावर विजय मिळवून शकतो.
➡️भ्रमिष्ट विचारांच्या शध्दीकरता प्रार्थना ही एक जीवनदायी वनस्पती आहे.
➡️प्रार्थना हे ईश्वराशी जोडलेले अनुसंधान आहे.
➡️शरीराला जशी अन्नाची भूक लागते तशी आत्म्याला प्रार्थनेची भूक असते.
➡️कर्तव्यपरायणता हीच प्रार्थना होय.
➡️आपले कर्तव्य करण्यातच प्रार्थना सामावलेली आहे.
➡️प्रार्थनेसाठी हदय आवश्यक असते, वाचा नव्हे.
➡️न्हदयापासून केलेली प्रार्थना आत्म्याचे कल्याण करते.
➡️प्रार्थनेमुळे अंतरात्मा अधिक जागृत होतो.
➡️प्रार्थना कधीही निष्फळ होत नाही.
➡️आपल्या आतील परमेश्वराच्या अस्तित्वावर जिवंत श्रध्द असल्याशिवाय प्रार्थना अशक्य असते.
➡️प्रार्थना न्हृदयाचा शोध आहे.
➡️हल्ला आणि गोंगाट होत असतांना देखील आपल्या प्रार्थनेमध्ये लीन होऊन जाण्यातच मनुष्याचे साधुत्व आहे.
➡️जो दुःख भोग्ण्यास तयार असतो तोच ईश्वराची प्रार्थना करु शकतो.