१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी भाषण independence day speech 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी भाषण independence day speech 

सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिना विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी मी सर्वांना विनंती करतो

भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर १५ ऑगस्ट १९४७ साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला.

स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला पंडित नेहरुंनी दिलेल्या या

भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमयी प्रवास उलगडला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं. भारत जगतील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. परंतू विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ठय ठरले आणि आज अनेक वर्षांनंतरही स्वातंत्र्यतोत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे गेले नाहीत. (अपवाद काही धार्मिक संघटना) भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण असा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्वतः चा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जातयं.

भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या किबहुना त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. प्रश्न पडतो की खरच आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो. पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो आहोत

महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे तरच आपला भारत देश महासत्ता बनेल. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी स्वतःपासून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जहाँ डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा ।

वो भारत देश है मेरा ।

आपला भारत देश सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया व देशभक्तांचे स्वप्न पूर्ण करूया

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

Related posts:

Leave a Comment