भारतीय संविधान दिनावर आधारित 500 शब्दात मराठी निबंध essay on bhartiya sanvidhan din 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय संविधान दिनावर आधारित 500 शब्दात मराठी निबंध essay on bhartiya sanvidhan din 

आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक शाळेमध्ये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिन साजरा केला जातो. हा दिन आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आनंदाचा आहे. आपल्या भारत देशात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस’ संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली तो हाच दिवस होय. त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या १४० कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी हे संविधान आहे. आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवलेले आहेत. या संविधानांतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, संसद, राज्य विधिमंडळ, पंतप्रधान, आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये त्याअंतर्गत काम करतात. या शिवाय, याच संविधानाने आपल्या अनेक हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो. देशातील नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मूळ उद्देश आहे. याचबरोबर संविधानामध्ये कर्तव्य देखील सांगितलेली आहेत.

सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा दिन म्हणजे आपल्या सर्व भारतीयांसाठी सोनेरी दिन होय. या दिनाचे महत्त्व आपण सर्वजण जाणून आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने संविधानाच्या रूपाने भारतात लोकशाही अस्तित्वात आली. आपला भारत देश प्रजासत्ताक बनला प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता होय

आज आपण सर्वजण संविधान दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. हा तो दिवस आहे जेव्हा संविधान तयार झाले.

२६ नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या १४० कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. राज्यघटनेतच देशाची तत्त्वे आणि ती चालवण्याच्या पद्धती आहेत.

संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असले. तर, त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात.

आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते. संविधानाशिवाय देश चालवता येत नाही, म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, मौलाना अबुल कलाम आझाद हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते. तर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते.

संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर, १ वर्षानी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली.

२०१५ मध्ये भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. २०१५ हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्या वर्षी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. तेव्हापासून, संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. आपले भारतीय संविधान वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला. त्याचे बरेच भाग युनायटेड किंगडम, अमेरिका, जर्मनी, आयर्लंड,ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानच्या संविधानांमधून घेतले गेले आहेत. यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, सरकारची भूमिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय आहे, देश चालवताना त्यांची भूमिका काय असावी, अशा या सर्व गोष्टी राज्यघटनेत नमूद केल्या आहेत.

या संविधान दिनाच्या निमित्ताने आपण आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली पाहिजे. देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश तर पूर्ण होईलच शिवाय, संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्रही घडेल. आज देशातील एका मोठ्या वर्गाचे जीवनमान गरीब आफ्रिकन देशांपेक्षा वाईट आहे. त्याला अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांना शोषणाचे बळी व्हावे लागते. मित्रांनो, आज आपण अशा लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाले अमृत महोत्सव देखील साजरा करण्यात येत आहे परंतु आजही आपल्या देशामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे ही आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.

भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

जय हिंद, जय भारत…!

Leave a Comment