थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी मराठी भाषण lokshahir annabhau sathe jayanti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी मराठी भाषण lokshahir annabhau sathe jayanti 

सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग तसेच येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती

थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. अनेक नव्या पिढीतील लेखकांना त्यांच्या कथा, कादंबऱ्या प्रेरित करतात. त्यांनी आपल्या कार्यकाळात 35 कादंबऱ्या, 19 पोवाडे व कथाासंग्रह, 14 लोकनाट्य लिहिली.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाल्याने लहानपणापासूनच अण्णाभाऊंच्या वाट्याला हलाखीचं जगणं आल होतं. अण्णाभाऊ साठे कधीच शाळेत गेले नाहीत. मात्र, त्यांनी कुशाग्र अक्षर ज्ञान प्राप्त केले. अण्णाभाऊंनी मराठीत 35 कांदबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईमध्ये अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानायचे. त्यांनी जवळपास 21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. तसेच मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णने, कथा, कविता, गीते इत्यादी क्षेत्रात त्यांनी समृद्ध लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या मैना गावाकडे राहिली आणि मुंबईची लावणी या लावण्या गाजल्या.

महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होऊ नये यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा भारतात तसेच रशियामध्येही गायला. महाराष्ट्राला अण्णाभाऊ साठे शाहीर म्हणून परिचित होते. मात्र त्यांनी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकार चांगल्या पध्दतीने हाताळले. त्यांनी साहित्य क्षेत्रात जागितक स्तरावर स्थान मिळाविले आहे. त्यांनी लिहिलेले साहित्य 22 भाषांमध्ये ट्रान्सलेट झाले आहे. महाराष्ट्रात राजकीय प्रश्नांबाबत जागृती करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम यामध्ये त्यांनी शाहीरीतून मोठे योगदान दिले. 18 जुलै 1969 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या समृद्ध कलेने त्यांनी समाजसुधारणेचे त्यांचे उद्दिष्टय साध्य केले, त्यामुळे महाराष्ट्राच्या समाजसुधारकांच्या यादीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव अजरामर राहील, यात शंका नाही.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

 

Related posts:

Leave a Comment