सार्वत्रिक बदल्या २०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत sarvatrik badlya 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सार्वत्रिक बदल्या २०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत sarvatrik badlya 

प्रिय,

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ अधिसूचित करण्यात आलेला आहे. या नियमातील नियम ३ व ४ नुसार, सर्व विभागातील ६ वर्षे पूर्ण झालेल्या सह सचिव, उप सचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक व लघुलेखक संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या करण्याबाबतची कार्यवाही एप्रिल-मे २०२६ मध्ये करण्यात येणार आहे.

२. मागील अनेक वर्षापासून असे निदर्शनास आले आहे की, अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांच्या बदलीस मुदतवाढ देण्याची मागणी/बदली रद्द करण्याची मागणी संबंधित प्रशासकीय विभाग करतात. त्यामुळे बदली झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या विभागाने रुजू होण्यासाठी कार्यमुक्त न केल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण होतात.

३. बदली अधिनियमानुसार बदल्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे सन २०२६ च्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये आपल्या विभागातील जे अधिकारी / कर्मचारी बदलीस पात्र आहेत, त्यांची यादी करून त्यांच्या जागी पर्यायी अधिकारी/कर्मचारी यांची व्यवस्था करण्याची कार्यवाही आतापासूनच सुरू करण्यात यावी, जेणेकरून बदली झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर आपल्या विभागातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास अडचण निर्माण होणार नाही.

Related posts:

Leave a Comment