100 महत्त्वाचे शालेय सुविचार परिपाठासाठी अत्यंत उपयुक्त शालेय सुविचार shaley suvichar good thought
वचन देताना विलंब करा, पण पाळतांना घाई करा.
विद्या हे धन असे आहे की, दिल्याने वाढते आणि लपवून ठेवल्याने कमी होते.
सौंदर्य हे वस्तुत नसून पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते.
कला ही जीवनाची सावली आहे.
प्रसन्नता ही सर्व सद्गुणाची जननी आहे.
जीवन सुंदर करणेसाठी तिन गुणांची आवश्यकता असते, प्रेम, ज्ञान आणि शक्ती.
दुसऱ्यांचा चांगुलपणा पाहणेसाठी आपल्यात चांगुलपणा असावा लागतो.
प्रसंगाच्या सहाणेवर धैर्याला धार चढते.
उच्चारुन विव्दत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते. पं. नेहरु
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
संयम हा सोन्याचा लगाम आहे, त्याचे पशुचा माणूस आणि माणसाचा देव होतो.
हास्य हे जीवनवृक्षाचे फुल आहे, परंतु आश्रू हे त्याचे फळ आहे.
उच्च शिक्षण त्यालाच म्हणावे की, जे प्राप्त झालेले लोक विनम्र, पारेकरी, सेवाभावी आणि कार्यतत्प.
जीवन हे एक फुल आहे आणि प्रेम हा त्यातील मध आहे.
नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश.
देव माणसात पाहवा, मातीच्या मुर्तीत नाही.
ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हेच खरे शिक्षण.
जो दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.
जगून मरण्यापेक्षा, मरुन जगण्यात मोठेपणा आहे.
जीवन म्हणजे विचार, अनुभव आणि श्रध्दा यांचे घनफळ आहे.
जीभ जिंकणारा जग जिंकतो.
जीवनातील अंधःकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !
प्राप्तीच्या आनंदपेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो.
मित्राच्या मृत्युपेक्षा मैत्रिच मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ आहे.
मनुष्य विचारी असेल, तत्वज्ञ बनतो. विकारी असेल ता बेताल बनतो.
शिक्षण म्हणजे आपल्या आज्ञानाचा वेध घेणारा प्रगत शोध होय.
लीन असावे पण दीन असू नये.
काटकसर ही वार्धक्यातील आरामखुर्ची आहे.
जो वेळेवर जय मिळवील तो जगावर जय मिळवील.
समता, स्वातंत्र आणि सहानुभूती यांनीच व्यक्ति विकास होतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्य आणि न्याय याहून कोणताच धर्म मोठा नसतो. म. गांधी
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत.
शब्दाचा घाव तलवारीच्या वारापेक्षा अधिक वर्मी लागतो.
अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा मधूर झरा वाहतो.
उपदेशक, विचारवंत, व्हा, पण आगोदर आचारवंत व्हा.
कृत्ती चटका लावणार असावी, देणार नसावी.
चारित्र्याच्या विकास हेच खरे शिक्षण. म. गांधी
कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भूत कार्य घडतात.
गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा.
चित्र ही हाताची कृती आहे. पण चरित्र ही मनाची कृती आहे.
सगळ्या गोष्टी हातातून निघून गेल्यावर जे उरते त्याला अनुभव म्हणतात.
शिक्षण म्हणजे शरीर व बुध्दी यांचा समतोल विकास. म. गांधी
जीवन फलासारखे असु द्या पण ध्येय मात्र मधमशीप्रमाणे ठेवा.
आधुनिक राष्ट्राच्या उभारणीसाठी शिक्षणासारखे कोणतेही प्रभावी साधन नाही. पंडित नेहरु
प्रयत्न हा परिस आहे. त्याचे स्पर्शाने नरकाचे नंदवन होते.
शिक्षणाला निती अणि चारित्र्याचे अधिष्ठान हवे. डॉ. राधाकृष्णन
वसन शरिराचे रक्षण करते तर व्यसन घराची राखरांगोळी करतो.
स्नहोचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपतीपेक्षा अधिक मोलाचा असतो.
शिक्षणाची मुळे कडू असली तरी त्याचे फळे मधुर असतात.
ग्रंथ हेच गुरु होत.
आपल्या हातून काही चुका घडल्यास आपल्यामुळे ज्यांना त्रास होईल त्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करणे हा
मनाचा मोठेपणा आहे.
प्रेम, सेवा, त्या हेच राष्ट्र धर्माचे सूत्र आहे.
त्यागाने पापाचे मुद्दल फिटते, दानाने पापाचे व्याज चुकते.
निष्क्रिय महत्वकांक्षा म्हणजे अपयशाला आमंत्रण आहे.
ज्यांचावर आपल्याला मात करता येत नाही त्यांच्याशी हातमिळवणी करणेच श्रेयस्कार असते.
कोण कोणासारखा दिसतो यापेक्षा कोण कसोणासारखा वागतो याला अधिक किंमत आहे.
विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे.
पुस्तकासारखा मित्र नाही, ग्रंथासरखा गुरु नाही.