केंद्र पुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत दिनांक 01 ते 14 सप्टेंबर 2026 या कालावधीत “उल्लास साक्षरता पंधरवडा (ULLAS Literacy Fortnight)” आयोजित करण्याबाबत ULLAS Literacy Fortnight navabharat saksharta karyakram
संदर्भ :
– १) भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. F. No. 6-1/2023-AE-2, दिनांक 13 ऑगस्ट 2026.
२) भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे D.O. No. 6-2/ 2024-ΑΕ-1, दिनांक 18 ऑगस्ट 2026.
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मधील उद्दिष्टांनुसार 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करून देण्यासाठी उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी दिनांक 08 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने भारत सरकारच्या निर्देशानुसार दिनांक 01 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2026 या कालावधीत देशभर उल्लास साक्षरता पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सदर उल्लास साक्षरता पंधरवडा व्यापक स्वरूपात व लोकसहभागातून आयोजित करण्यात यावा. साक्षरता पंधरवड्याच्या कालावधीत जिल्हास्तर, तालुकास्तर तसेच गावपातळीवर खालीलप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे :-
उल्लास साक्षरता पंधरवाड्यासाठी सूचक उपक्रम- २०२६











