१५ आगॅस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी भाषण indian independence day
पूजनीय तिरंगा झेंडावंदन ह्या आजच्या कार्यक्रमाचे श्री. नितिन नाईक पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, कनकोर, गावातील निमंत्रित पालक वर्ग व इतर पाहुणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग माझे विद्यार्थी मित्र, मित्रांनो मी आज तुमच्या समोर १५ ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द थोडक्यात सांगत आहे. आपला भारत देश हा अज्ञान, अशिक्षित होता. त्याकाळी इंग्रज भारतात आले. हळूहळू व्यापार करू लागले. व देशावर आपला हक्क करून घेतला. इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती. भारतीय नागरिकांना अतोनात मारहाण करायचे, त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण पिक त्यांना द्यावे लागत. अनेक प्रकारचा कच्चा माल, खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून आम्हाला ते विकायचे. या अन्यायाचा सूड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरुषांनी त्या काळी जन्म घेतले. जसे भगतसिंग, राजगुरु, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, इंदिरा गांधी या अनेक थोर महापुरूषांनी आपल्या प्राणाची आहुती
दिली.
आपल्या भारतीय लोकांना आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम-गिरीतून मुक्त व्हावा म्हणून हातात काठ्या व मशाल घेवून मोर्चे काढत होते. त्या मोर्चात इंग्रजांना मदत करणारे, फितुर लोक बंदुकीने भारतीयांना ठार मारत असत. असे लाखो भारतीय या देशाच्या स्वातंत्र्याकरिता शहीद झालेत. मित्रांनो एकदा अमृतसरच्या जालियनवाला बाग मध्ये सभा सुरू असताना इंग्रजांचा एक क्रूर जनरल डायर याने अनेक नागरीकांना गोळीबाराचे देश देवून मध्ये ठार केले. असे अनेक प्रसंग आहेत की आपण ज्यांची कल्पना करू शकत नाही.
दिवसा वर दिवस लोटत गेले व इंग्रजांना हाकलून लावण्याचा कर आपल्या भारतीयांना लक्षात आले. इंग्रजांना शेवटी लक्षात आले की आता भारतीय लोक जागृत झाले जागृत झाले आहेत. त्यांना स्वतंत्र करणे गरजेचे आहे. म्हणून इंग्रजांनी आपली सर्व व्यावस्था इंग्लंडला घेवून गेले. व पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाधीन करून आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र म्हणून घोषित केले. मित्रांनो तो दिवस भारतीयांना मोठा आनंदाचा होता, दुःखाचे दिवस सुखात आले, प्रत्येक भारतीयांना वाटले होते. आज ह्या प्रसंगी प्रत्येक कोर्ट कचेरी, शाळा व सरकारी कार्यालय मध्ये आपल्या भारत देशात स्वतंत्र दिवस म्हणून तिरंगा फडकविण्यात येतो. ध्वजारोहण करून थोर पुरुषांना श्रध्दांजली वाहतो. त्यांचे कार्य व गुण गातो
स्वातंत्र्य दिनाचे महत्व काय ते प्रत्येक भारतीयांना भाषणाच्या मार्फत कळते.
मित्रांनो आज आपला भारत देश फार शक्तीशाली राष्ट्र बनला आहे. कोणत्याही देशाने जर डोळा वाकडा केला तर त्याचा डोळा बाहेर काढायला एक ही मिनिट लगणार नाह हे निश्चित. तर आज मी. तिरंगी झेंड्याला व त्या महान हुतात्म्यांना खरी श्रध्दांजली वाहतो व माझे भाषण संपले असे जाहीर करतो.
बोलो भारत माता की जय… जय…. जय
जय हिंद जय भारत







