पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षा अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत pavitra portal 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षा अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत pavitra portal

वाचा :

१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र. १७४/टीएनटी-१, दि. २१.०६.२०२३.

२. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क/प्राथ-१०६/शै.स-रि.पदे/२०२५/१६०८७१९, दि. १६.१२.२०२५

प्रस्तावना :

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. उपरोक्त संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये सद्यस्थितीत ८०% पर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. दरवर्षी सेवानिवृत्ती व संचमान्यतेनुसार उपलब्ध होणा-या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतूदीनुसार शाळांतील पदे १०% पेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अखेर संभाव्य रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संचमान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अखेर म्हणजे माहे मे-२०२६ अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयात नमूद मर्यादेत शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०१०११२१२४५००२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment