12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तडफदार मराठी भाषण rajmata jijau jayanti bhashan
जन्म आणि बालपण
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आपल्या शाळेमध्ये उत्साहात साजरी करत आहोत त्यानिमित्ताने मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी मी सर्वांना विनंती करते.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव होते. लखुजी जाधव हे निजामशाहीतील एक महत्त्वाचे सरदार होते. जिजाऊंच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाऊ लहानपणापासूनच अभ्यासू आणि बुद्धिमान होत्या. त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण, घोडासवारी आणि आयुर्वेद यांचे शिक्षण देण्यात आले होते. जिजाऊंचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला होता. शहाजी राजे हे निजामशाहीतील एक महत्त्वाचे सरदार होते. कामानिमित्त ते नेहमीच वेगवेगळ्या दौऱ्यावर असत, त्यामुळे शिवाजी राजांची जबाबदारी राजमाता जिजाऊंचीच होती.
शिवरायांना लहानपानापासूनच जिजाऊंनी धर्माचे रक्षण व स्वराज्याचे महत्त्व याचे बाळकडू पाजले. शिवबांना त्या नेहमी रामायण व महाभारतातल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायच्या. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना एक चांगले शिक्षण दिले आणि त्यांना एक महान योद्धा बनवण्यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना नेहमी स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली.
त्यांनी आपल्या मुलाला शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचा संकल्प दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि स्वराज्याची स्थापना केली. राजनीतीचे पहिले धडे त्यांनी शिवाजी महाराजांना दिले. आपल्या कर्तव्यनिष्ठतेचे पालन करत असतानाच राज्यात समान न्याय करणे आणि अन्याय वा गुन्हे करणार्यांना कठोर शिक्षा देण्याचे धैर्य त्यांनी शिवरायांना दिले.
जिजाऊंनी शिवाजी महाराजांना धर्मनिष्ठ, शूर, कर्तव्यदक्ष आणि रयतेच्या हितासाठी वचनबद्ध बनवले. जिजाऊंचा शिवाजी महाराजांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. त्यांनी शिवाजी महाराजांना एक महान योद्धा, राजा आणि देशभक्त बनवले.मराठा साम्राज्याच्या इतिहासात जिजाऊंच्या योगदानाचे खूप महत्त्वाचे स्थान आहे.
जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिलेल्या शिक्षण आणि मार्गदर्शनामुळे मराठा साम्राज्याची स्थापना होण्यास मदत झाली. शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या आदर्शाचे पालन करून मराठा साम्राज्याचे विस्तार केले आणि भारताच्या इतिहासात एक अविस्मरणीय स्थान निर्माण केले.
राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना अनेक मौल्यवान शिकवणी दिल्या.
राजमाता जिजाऊंची शिकवण
“सदैव धर्मावर आणि नीतिमत्तेवर विश्वास ठेवा.
आपल्या धर्माचे सदैव रक्षण करा .
स्वराज्यासाठी लढा आणि ते प्राप्त करा.
आपल्या मातृभूमीवर प्रेम करा आणि त्याची सेवा करा.
शत्रूला कधीही कमी लेखू नका.
नेहमी सचोटीने जगा आणि प्रामाणिक राहा.”
शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज होण्यामागे या महान मातेचा अत्यंत मोलाचा हात आहे ….. आणि म्हणूनच आपण “जय जिजाऊ ! जय शिवराय !!” असे वंदितो.
जिजाऊंच्या या विचारसरणीमुळे मराठा साम्राज्यात एक मजबूत संस्कृती आणि परंपरा निर्माण झाली.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन अवघे बारा दिवस झाले असतानाच 17 जून 1674 रोजी रायगड किल्ल्याजवळील पाचाड गावात जिजाऊंचे निधन झाले.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी आपले जीवन समाजासाठी स्वराज्यासाठी समर्पित केले आज त्यांची जयंती आपल्या शाळेमध्ये उत्साहात साजरी करत आहोत त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते.
जय जिजाऊ जय शिवराय









