12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मराठी भाषण swami vivekananda jayanti bhashan
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला आज 12 जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत त्यांची जयंती अतिशय उत्साहात आपण साजरी करत आहोत त्या निमित्ताने मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी मी तुम्हाला विनंती करते.
जन्म व बालपण
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते.
लहानपणापासूनच ते एक कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाचे होते. त्यांना धार्मिकतेची आवड होती. त्यांनी वेद, उपनिषद, पुराण इत्यादी हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केला.1881 मध्ये त्यांनी श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करले.रामकृष्ण परमहंस हे एक महान योगी आणि संत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंदांनी आत्मज्ञान प्राप्त केले.
1893 मध्ये स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या विश्वधर्म महासभेत सहभागी झाले.
या महासभेत त्यांनी आपल्या भाषणात हिंदू धर्माची आणि भारतीय संस्कृतीची महती सांगितली. त्यांच्या या भाषणाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले.स्वामी विवेकानंदांनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक आणि धार्मिक सुधारणा केल्या.त्यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि रूढीवादांचा निषेध केला.तसेच सामाजिक समता आणि न्यायासाठी आवाहन करून स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली.
स्वामी विवेकानंद हे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. ते एक उत्तम वक्ते, विचारवंत आणि समाजसुधारक होते.त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी भारताला आणि जगाला प्रेरणा दिली आहे.
स्वामी विवेकानंदांचे विचार खालील प्रमाणे
“जगातील सर्व धर्म एकच आहेत.”
“ज्ञान आणि शक्ती दोन्ही आवश्यक आहेत.”
“स्वतःवर विश्वास ठेवा, तर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल.”
त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्याला अर्थ देतात. त्यांची अचल श्रद्धा आणि जिद्द आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे.स्वामी विवेकानंद हे एक आंतरराष्ट्रीय नेते होते. त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांना भेट दिली आणि भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली.त्यांनी भारतीयांना जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.
स्वामी विवेकानंदांनी आपल्या संस्कृतीचा खरा सार जगाला दाखवला. त्यांनी आपल्याला आपल्या संस्कृती वर अभिमान बाळगायला शिकवले.त्यांनी वेदांताचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत समजावले आणि त्यांच्या शिकवणींनी लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले.तरुणांची शक्ती जागृत करणे
12 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा करतो त्याचे कारण म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी युवकांना प्रेरित करण्याचे काम केले.त्यांच्या शिकवणींमुळे अनेक तरुणांनी आपली क्षमता ओळखली आणि स्वामी विवेकांनद यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपल्या जीवनात त्यांनी ते अंगिकारले .
महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारखे थोर व्यक्तिमत्त्व सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रभावित होते. त्यांनी तरुणांना स्वावलंबी बनण्यास आणि समाजात सकारात्मक बदलाव आणण्याची प्रेरणा दिली.
त्यांचा हा विश्वास होता कि आजचा युवक हाच देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे, म्हणून त्यांनी युवकांना केंद्रित करून हे आवाहन केले की, “उठा, जागृत व्हा आणि आपले ध्येय साध्य करा.”
त्यांनी सर्व धर्मांचा आदर करणे आणि मानवतेला एक करण्याचे आवाहन केले.त्यांनी जगाला शिकवले की आपण सर्व एकच आहोत आणि आपण एकमेकांच्या मदतीनेच प्रगती करू शकतो.स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्याला हेच शिकवतात कि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून कठोर परिश्रम करून आपले ध्येय गाठायला हवे, अडचणी या येणारच पण आपण त्या अडचणींवर मात करून आव्हानांना न भिता सकारात्मक राहून त्यांचा सामना करायला हवा.
प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत राहून समाजाला मदत करत राहणे गरजेचे आहे आणि त्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे .स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपल्या भाषणातून आणि कार्याने भारतीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले.
स्वामी विवेकानंद यांचे जयंती आज आपल्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहात आपण साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला पूर्णविराम देते.
धन्यवाद









