शिक्षक दिनानिमित्त भाषण speech on teachers day
पूज्यनिय विद्येची देवता सरस्वती माता (शारदा माता) यांची प्रतिमा, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच साहेब, माझ्या शाळेतील मुख्याध्यापक साहेब तसेच सर्व गुरूजन विद्यार्थी, विद्यार्थिनी. मित्रांनो मी आज तुम्हाला शिक्षक दिवस या प्रसंगी शिक्षकांचे कर्तव्य, शिक्षकांचे तत्व, विद्यार्थ्यांचे नाते शिक्षकाबरोबर कसे असते यावर विशेष बोलणार आहे.
दरवषीं प्रमाणे आम्ही ह्या वर्षीसुध्दा शिक्षक दिवस साजरा करत आहोत. मित्रांनो आजचा दिवस जन्म म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ साली झाला. आंध्रप्रदेशच्या तिरूपती या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
मित्रांनो, डॉ सर्वपल्ली हे आधुनिक भारताचे एक आदर्श शिक्षक होते. जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांना भारताचे उपराष्ट्रपती पद देण्यात आले एवढच नाही तर रुस मध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे भूमिका पार पाडली. तेव्हा रुस मध्ये स्टालिनचे शासन होते. त्यांनी एकदा आपल्या भाषणात सांगितले की शिक्षकांचे जीवन किती महान व नास्तिक आहे. विद्यार्थी मित्रांनो शिक्षक हे एक असं उपकरण आहे कि ज्यांना भले भले युगंपुरुष, महापुरूष त्यांच्या मार्गदर्शनाने घडले. जसे डॉ बाबासाहेब आंबेडकर, कल्पना चावला, राजीव गांधी मित्रांनो शिक्षक हे आपले दुसरे गुरू आहेत व प्रथम आई. गुरूजींचा नेहमी आदर, मान ठेवला पाहिजे. त्यांना नेहमी मान दिला पाहिजे. कारण समाजात
घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो
*
मित्रांनो एका मराठी शिक्षकांनी म्हटले होते की, हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांना जुमानत नाही. म्हणजे सोबत मद्यपान करणे, विरंगुळा करणे यात कसलाही मान मर्यादा नसतो. शिक्षक हे कधीच भेदभाव करत नसतात. सर्व विद्यार्थ्यांना एका नजरेने बघतात. शिक्षक हे आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. अभ्यासात प्रत्येक विद्यार्थी परिपूर्ण व्हावा याची ते नेहमी काळजी घेतात. कधी कधी त्यांना विद्यार्थ्याना शिक्षा करावी लागते. परंतू ती शिक्षा नसून ज्ञानरूपी आशिर्वाद आहेत. परंतू आज परिस्थिती, उलट आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा केली तर पालक वर्ग बोंब ठोकतात. म्हणूनच तर विद्यार्थी परीक्षेत नकल करतात. आज विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षकांना समजून घेणे आवश्यक आहे, शिक्षणात कमजोर विद्यार्थ्यांने त्यांना प्रेमाने समजावे.
मित्रांनो सरकारने सुध्दा शिक्षकांच्या मागे खूप मोठी धावपळ लावली आहे. अनेक प्रकारची शासकिय कामे त्यांच्या वर थोपवली जातात. म्हणून विद्यार्थ्यांचे खूप मोठं नुकसान होते हे प्रत्येक शिक्षकांना माहितच आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या अंतिम समयी मोठ्या आत्मीयतेने रडत म्हणाले, माझ्या हृदयात परिवर्तन झाले आहे असे गौतम बुद्धाच्या समोर आल्यानंतर अंगुलीमाल नावाचा डाकुच्या हृदयात झाले होते.
विद्यार्थी मित्रांनो आपल्या या महाराष्ट्रतच नव्हे तर संपूर्ण
भारतात शिक्षक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवसी विद्यार्थी काहीतरी भेट वस्तू शिक्षकांना देतात असे एकलव्याने आपला अंगठा दान केला होता. शिक्षकांचा गौरव म्हणजे विद्यार्थ्यांच्या विकासात वाढ करणे असे मी समझतो. आजच्या प्रसंगी मी इंप्रजीचे शिक्षक श्री. ज्ञानबा इंगोले यांना खरी श्रद्धांजली वाहतो व माझे भाषण इथेच संपवितो.








