क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले (थोर समाज सुधारक) mahatma jotiba fule marathi bhashan
आजच्या ‘या शुभदिना निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक गुरूजन व शांतपणे बसलेले माझे प्रिय वर्ग बंधू, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी.
आज दिनांक ११ एप्रिल २०२३ मला आज आपल्या समोर दोन गोष्टी सांगायला
आपण संधी दिल्याबद्दल फार फार धन्यबाद, तर मित्रांनो मी त्या महान व्यक्ती बद्दल बोलत आहे. ज्यांनी खालील पंक्ती लिहिल्या.
विद्ये विना मती गेली।
मति विना निती गेली।।
निती विना गती गेली।
गति विना वित्त गेले ।।
वित्तविना शुद्र खचले।
इतके अनर्थ एका विद्येने केले ।।
महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला पुणे येथे झाला. त्यांचे वडील गोविंदराव हे सातारा जिल्हयातील कंटगुण गावचे मूळ रहिवासी होते. मित्रांनो त्यांचे आडनाव पूर्वी गो-हे होते. परंतू त्यांचा. फुलांचा व्यवसाय होता म्हणून त्यांना लोक फुले म्हणू लागले व कायमचे ते फुलेच झाले. या मुलाने शाळा शिकू नये म्हणून काही लोकांनी त्यांची बुध्दी भ्रमित करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या वडिलांनी १३ व्या वर्षीच ज्योतिबांचा विवाह झगडे पाटीलच्या मुलीशी म्हणजे सावित्रीबाई या मुलीसोबत लावून दिला. परंतू विद्यार्थी मित्रांनो ज्योतीबांचं चातुर्य आणि कौशल्य पाहून एका मुसलमान समाजातील उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी यांनी त्यांच्या वडिलांना ज्योतीबाला शाळेत पाठवा म्हणून गांभीर्याने सांगितले.
त्यांना पुढे इ.स. १८४१ मध्ये एका स्काटिस मिशनरी शाळेत दाखल केले. त्यांनी शिवाजी महाराज व वॉशिंग्टन यांचा जीवन
चरित्राचा अभ्यास केला.
विधार्थी मित्रांनो त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा प्रसंग सांगतो. ज्योतीराव जेव्हा आपल्या ब्राम्हण मित्राच्या लग्राला गेले होते. त्या वरातीमध्ये त्यांचा शुद्र म्हणून अपमान केला व त्यांना वरातीच्या मागे व्हा म्हणून सांगितले. सहजच गोष्ट, एवढा मोठा अपमान कोण सहन करणार अज्ञानरूपी अंधाराला दूर करण्यासाठी त्यांनी कंबर कसली व पुण्यामध्ये मुलींची पहिला शाळा बुधवार पेठेत भिंड्यांच्या वाड्यात १८४८ ला भरविला. त्या काळी शिक्षक मिळत नव्हते. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवून शिक्षिका बनवले. आर्थिक परिस्थितीमुळे काही दिवस त्यांना शाळा बंद ठेवावी लागली. १८५१ मध्ये चिपळूणकरांच्या वाड्यात शाळा सुरू केली त्यात ४८ मुली येत होत्या मित्रांनो सरकारी शाळेमध्ये १० पटीने विद्यार्थी ज्योतीबाकडे शिक्षण घेत होते म्हणून एका ज्ञानप्रकाश वर्तमान पत्रात लिहून आले की सर्व जातीच्या समाजाच्या मुलांसाठी ज्योतीराव फुले मोठी मेहनत करून शिकवतात. त्यांना बोर्डामार्फत शालजोडी देवून १८५२ ला सत्कार केला. पूर्वी (मुलींना) स्त्रीयांना पुरूषांबरोबर मान नव्हता. चूल आणि मूल एवढेच
महात्मा ज्योतीबा फुलेंनी बालविवाह थांबविला व पुर्नविवाह घडवून आणला. विधवा स्त्रीला पुन्हा समाजात लग्र करून देण्याचा अधिकार मिळवून दिला.
चरित्राचा अभ्यास केला.
विधार्थी मित्रांनो त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा प्रसंग सांगतो. ज्योतीराव जेव्हा आपल्या ब्राम्हण मित्राच्या लग्राला गेले होते. त्या वरातीमध्ये त्यांचा शुद्र म्हणून अपमान केला व त्यांना वरातीच्या मागे व्हा म्हणून सांगितले. सहजच गोष्ट, एवढा मोठा अपमान कोण सहन करणार अज्ञानरूपी अंधाराला दूर करण्यासाठी त्यांनी कंबर कसली व पुण्यामध्ये मुलींची पहिला शाळा बुधवार पेठेत भिंड्यांच्या वाड्यात १८४८ ला भरविला. त्या काळी शिक्षक मिळत नव्हते. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवून शिक्षिका बनवले. आर्थिक परिस्थितीमुळे काही दिवस त्यांना शाळा बंद ठेवावी लागली. १८५१ मध्ये चिपळूणकरांच्या वाड्यात शाळा सुरू केली त्यात ४८ मुली येत होत्या. मित्रांनो सरकारी शाळेमध्ये १० पटीने विद्यार्थी ज्योतीबाकडे शिक्षण घेत होते म्हणून एका ज्ञानप्रकाश वर्तमान पत्रात लिहून आले की सर्व जातीच्या समाजाच्या मुलांसाठी ज्योतीराव फुले मोठी मेहनत करून शिकवतात. त्यांना बोर्डामार्फत शालजोडी देवून १८५२ ला सत्कार केला. पूर्वी (मुलींना) स्त्रीयांना पुरूषांबरोबर मान नव्हता. चूल आणि मूल एवढेच
महात्मा ज्योतीबा फुलेंनी बालविवाह थांबविला व पुर्नविवाह घडवून आणला. विधवा स्त्रीला पुन्हा समाजात लग्र करून देण्याचा अधिकार मिळवून दिला..









